पोस्ट्स

कृषी पर्यटन

शाश्वत विकास      खेड्याचे विस्तारीकरण झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळते.  धकाधकीचे जीवन आणि वाढते "शहरीकरणामुळे"  लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. ग्रामीण जीवनपद्धतीचा विसर पडू नये म्हणून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून  हि जीवन शैली अनुभवने आनंददायी आहे.  यामुळेच आजकाल कृषी पर्यटन पर्यटकांना  आकर्षित करून घेते.  शाश्वत विकासासाठी असा विकास आवश्यकच मानावा नाहीतर खेडी सुधारणार नाहीत. आपल्या सर्व जुन्या संकल्पना , रीती, जगण्याच्या पद्धती आणि समृद्ध वारसा तसेच वास्तुशिल्पानाही आपल्या गावात स्थान द्यावे, त्याचे जतन करावे व तो वारसा तसाच पुढच्या पिढीकडे सुरक्षित रित्या सोपवावा. जेणेकरून त्या पिढीला त्याचा लाभ झाला पाहिजे तेव्हाच तर आपण याला शाश्वत विकास म्हणू.   आपली या क्षेत्रातील मते / अभिक्रिया जरूर  कळवा.  ______ डॉ. माधुरी वर्तले 

Economic Thought

  “The ideas of economists and political philosophers, both when they are right and when they are wrong are more powerful than is commonly understood. Indeed, the world is ruled by little else. Practical men, who believe themselves to be quite exempt from any intellectual influences, are usually slaves of some defunct economist.” ―  John Maynard Keynes

भारतातील महिला अर्थतज्ञ...

इमेज
 भारतातील महिला अर्थतज्ञ... भारतात अनेक जणांनी केवळ त्याचा विकास व्हावा या साठी सदैव  झटत राहणारे विचारवंत आपल्याला प्रत्येक राज्यांत दिसतात. स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्याचे काम केले. भारताला स्वयंपूर्ण करून आता आत्मनिर्भर कडे वाटचाल असा प्रवास करत असताना कित्येक थोर लाधेले , जिंकले, सामाजिक जळमटे दूर करून नवी दिशा दाखविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. यामध्ये काही वेळा महिलांनीही आपला सहभाग दाखविला, दिलेल्या जबाबदार्या पार पाडल्या . भारताला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठीच प्रत्येक जण धडपडत होता. कोणताही मार्ग सुकर कधीच नसतो, अनेक अडथळे पार करून तो गाठावा लागतो, त्याप्रमाणे अनेक जण वैचारिक घडी बसविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच आपण आजचा समृद्ध भारत बघतोय. बरोबर न...  भारतात आजपर्यंत ज्या महिला अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊ थोडेसे... किती जण आहेत माहित आहे का?... असल्यास आठवा ...तोपर्यंत मी फोटो पाठवते तुमच्यासाठी ... पहा बर...पटते  का ओळख....? पद्मभूषण , देवकी जैन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पुढील लेखात ... 

आर्थिक संकटात शोधा नव्या संधी ...!

इमेज
 देशात सर्वत्र कोविड -१९ या महामारीने हैराण केले असताना हा लेख प्रपंच करण म्हणजे माझ्यातील अभ्यासकाला जे दिसतंय हे तुम्हा सर्वाना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न .... परवा  झाले असे  की,  माझी मुलगी youtube वर गोष्टी बघत बसली होती. त्या गोष्टीतील एक लहान मुलगा फक्त डोसाच खात असतो ....नाही केला तर उपाशी राहतो ...यामुळे आपल्या मुलाला चांगले दिले पाहिजे या विचाराने त्याची आई त्याला सर्व भाज्यांचे डोसे बनऊन देते. असे करत करत तो मोठा होतो. अभ्यासात जेमतेम असतो त्यामुळे पुढे नोकरी शोधायला जातो तेव्हा त्याचे मित्रं मोठ्या पदावर गेलेले असतात आणि त्याची गंमत करतात. त्याला चिडवतात, त्यमुळे तो नाराज होऊन घरी येतो. खिन्न आणि चिंताग्रस्त मुलाला आई विचारते की काय झाले? त्यावेळी तो घडलेला प्रकार आईला सांगतो .... मग त्याच्या डोक्यात कल्पना येते कि , छोट्याश्या हातगाडीवर डोसा तयार करायचा आणि तो विकून स्वताच्या पायावर उभे राहायचे आणि हसणाऱ्या त्याच्या मित्रांना उत्तर द्यायचे . ते हि आपल्या कामातून ... तो उद्योग सुरु करतो, इतक्या विविध प्रकारचे डोसे बनवू लागतो कि ज्यामुळे काही वर्षत तो चा...

अर्थवाणी

कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद देशाचे नागरिक आम्ही...  ही एक हकीकत आहे. भारतीय नागरिक म्हणून काम केले आहे. जे की स्वत:ला बंद करून घरात कोणत्यातरी कामात व्यस्त राहणं... किती कठीण असते... आपण तसंही रोज काम करतोच ना मग कोरोना मुळे घरी राहणं अवघड का होत आहे... मला वाटतं त्यासाठी दोन कारणं असावीत, एक स्वत: व्यस्त कसे रहावे हे कळत पण वळत नाही. दुसरे म्हणजे काय फरक पडतो? अशी वृत्ती आपल्याला कामापासून दूर नेते. आपण सामाजिक वृत्तीचे असल्याने असं एकटं राहणं अवघड होते. हे खरं तर वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाचे वाटत असले तरीही आता हे चालणार नाही... देशातील कामगार देशोधडीला लागलेत.      उत्पादन ठप्प झाले आहे.  मायदेशी परतणारे , पायी जाणारे कामगार निष्कारण अपघाती गेले. हि हळहळ देशभरात सर्वत्र दिसली. मनात  असं वाटून गेलं ; बर झालं आपण यात नाही. आपल्याला जागेवर पुरेसा अन्न आणि निवारा आहे. हेच  खूप  आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी काळोखात गडप होऊन निद्रिस्त झाल्यासारखं वाटते. काहींना प्रश्न आहे इतका वेळ मिळतो आहे त्याच काय करायचं...मुलांना तर...

Arthvani: अर्थवाणी

Arthvani: अर्थवाणी : सागरी/ नील  अर्थशास्त्र              भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र वेढलेला आहे. खरं तर satellite view वरून नितळ,  अथांग, नितांत सुंदर दि...

अर्थ वाणी

माझ्या मनात अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वांना जागरूक केले पाहिजे असा विचार वारंवार येत आहे, यासाठी विविध प्रकारची माहिती संकलित करून आपल्या मनात निर्माण होत असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून या ब्लॉग वर येण्यास या वर्षी योजलेले पहिलेच पाऊल...!          आशा आहे आपण नक्कीच चांगले विचार  करायला सुरुवात करू. अर्थ वाणी रूजवू.....😊👍✨ नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!