कृषी पर्यटन
शाश्वत विकास खेड्याचे विस्तारीकरण झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळते. धकाधकीचे जीवन आणि वाढते "शहरीकरणामुळे" लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. ग्रामीण जीवनपद्धतीचा विसर पडू नये म्हणून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून हि जीवन शैली अनुभवने आनंददायी आहे. यामुळेच आजकाल कृषी पर्यटन पर्यटकांना आकर्षित करून घेते. शाश्वत विकासासाठी असा विकास आवश्यकच मानावा नाहीतर खेडी सुधारणार नाहीत. आपल्या सर्व जुन्या संकल्पना , रीती, जगण्याच्या पद्धती आणि समृद्ध वारसा तसेच वास्तुशिल्पानाही आपल्या गावात स्थान द्यावे, त्याचे जतन करावे व तो वारसा तसाच पुढच्या पिढीकडे सुरक्षित रित्या सोपवावा. जेणेकरून त्या पिढीला त्याचा लाभ झाला पाहिजे तेव्हाच तर आपण याला शाश्वत विकास म्हणू. आपली या क्षेत्रातील मते / अभिक्रिया जरूर कळवा. ______ डॉ. माधुरी वर्तले