पोस्ट्स

आर्थिक संकटात शोधा नव्या संधी ...!

इमेज
 देशात सर्वत्र कोविड -१९ या महामारीने हैराण केले असताना हा लेख प्रपंच करण म्हणजे माझ्यातील अभ्यासकाला जे दिसतंय हे तुम्हा सर्वाना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न .... परवा  झाले असे  की,  माझी मुलगी youtube वर गोष्टी बघत बसली होती. त्या गोष्टीतील एक लहान मुलगा फक्त डोसाच खात असतो ....नाही केला तर उपाशी राहतो ...यामुळे आपल्या मुलाला चांगले दिले पाहिजे या विचाराने त्याची आई त्याला सर्व भाज्यांचे डोसे बनऊन देते. असे करत करत तो मोठा होतो. अभ्यासात जेमतेम असतो त्यामुळे पुढे नोकरी शोधायला जातो तेव्हा त्याचे मित्रं मोठ्या पदावर गेलेले असतात आणि त्याची गंमत करतात. त्याला चिडवतात, त्यमुळे तो नाराज होऊन घरी येतो. खिन्न आणि चिंताग्रस्त मुलाला आई विचारते की काय झाले? त्यावेळी तो घडलेला प्रकार आईला सांगतो .... मग त्याच्या डोक्यात कल्पना येते कि , छोट्याश्या हातगाडीवर डोसा तयार करायचा आणि तो विकून स्वताच्या पायावर उभे राहायचे आणि हसणाऱ्या त्याच्या मित्रांना उत्तर द्यायचे . ते हि आपल्या कामातून ... तो उद्योग सुरु करतो, इतक्या विविध प्रकारचे डोसे बनवू लागतो कि ज्यामुळे काही वर्षत तो चा...

अर्थवाणी

कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद देशाचे नागरिक आम्ही...  ही एक हकीकत आहे. भारतीय नागरिक म्हणून काम केले आहे. जे की स्वत:ला बंद करून घरात कोणत्यातरी कामात व्यस्त राहणं... किती कठीण असते... आपण तसंही रोज काम करतोच ना मग कोरोना मुळे घरी राहणं अवघड का होत आहे... मला वाटतं त्यासाठी दोन कारणं असावीत, एक स्वत: व्यस्त कसे रहावे हे कळत पण वळत नाही. दुसरे म्हणजे काय फरक पडतो? अशी वृत्ती आपल्याला कामापासून दूर नेते. आपण सामाजिक वृत्तीचे असल्याने असं एकटं राहणं अवघड होते. हे खरं तर वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाचे वाटत असले तरीही आता हे चालणार नाही... देशातील कामगार देशोधडीला लागलेत.      उत्पादन ठप्प झाले आहे.  मायदेशी परतणारे , पायी जाणारे कामगार निष्कारण अपघाती गेले. हि हळहळ देशभरात सर्वत्र दिसली. मनात  असं वाटून गेलं ; बर झालं आपण यात नाही. आपल्याला जागेवर पुरेसा अन्न आणि निवारा आहे. हेच  खूप  आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी काळोखात गडप होऊन निद्रिस्त झाल्यासारखं वाटते. काहींना प्रश्न आहे इतका वेळ मिळतो आहे त्याच काय करायचं...मुलांना तर...

Arthvani: अर्थवाणी

Arthvani: अर्थवाणी : सागरी/ नील  अर्थशास्त्र              भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र वेढलेला आहे. खरं तर satellite view वरून नितळ,  अथांग, नितांत सुंदर दि...

अर्थ वाणी

माझ्या मनात अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वांना जागरूक केले पाहिजे असा विचार वारंवार येत आहे, यासाठी विविध प्रकारची माहिती संकलित करून आपल्या मनात निर्माण होत असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून या ब्लॉग वर येण्यास या वर्षी योजलेले पहिलेच पाऊल...!          आशा आहे आपण नक्कीच चांगले विचार  करायला सुरुवात करू. अर्थ वाणी रूजवू.....😊👍✨ नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!